Librería Samer Atenea
Librería Aciertas (Toledo)
Kálamo Books
Librería Perelló (Valencia)
Librería Elías (Asturias)
Donde los libros
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
खरेच का त्या लोकांना ’पुनर्जन्म’ नसून फक्त एकच जन्म आहे व फक्त भारतीय उगमाच्या धर्मांतील लोकांनाच जन्म, मृत्यू, व पुनर्जन्मांची साखळी अशी पुन्हा पुन्हा गर्भवासाची शिक्षा आहे? की स्वतः ईश्वराने वेगवेगळ्या ऋषी-प्रेषिताना मुद्दाम परस्परविरोधी माहिती देऊन मानवांमध्ये भांडणे, मारामार्यान होण्याची व्यवस्था केली आहे? माझ्या अल्पमतीला असे वाटते की, आजच्या जगांतील सगळे धर्म व त्यांतील सगळे देव व ईश्वर, जे मानवजातीने स्वतःच निर्माण केलेले आहेत ते व त्यांचे आनंद, स्वर्ग, मोक्षांची सगळी ’आश्वासने’ व त्यांच्या सगळ्या ’धमक्या’ हे सर्व काही आपण विसरून जाऊ आणि ’विज्ञान व मानवतावाद’ हा मार्ग पत्करू तरच मानवजात सुखी होईल. नाहीतर या धर्मांपासून व या ईश्वरांपासून मानवजातीची सुटका होणे फार कठीण आहे.